गेल्या काही दिवसांत विशेषत: फेब्रुवारीनंतर देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. मार्च महिन्यात या लाटेने कहर केला तर एप्रिल महिन्यात शिखर गाठले.
या नव्या लाटेचा महाराष्ट्र हे राज्य हॉटस्पॉट ठरले असून करोना विषाणूचे बदलते स्वरूप याला कारणीभूत असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.
जरी निराशाजनक वातावरण असले तरी तज्ञांनी यातही आशेचा एक किरण दाखवला आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यांनी या नव्या लाटेला थोपवण्यासाठी आणि करोनाची साखळी तोडण्यासाठी काही कडक पावले उचलली आहेत.
त्याचे सूक्ष्म परिणाम आता दिसू लागले आहेत. आणखी काही पाउले उचलत अशी काळजी घेतली तर येत्या एक दोन आठवड्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता असल्याचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी म्हटले आहे.
करोनात झालेला बदल हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. या कथित डबल म्यूटेशनचे 200 नमूने महाराष्ट्रात आढळून आले होते.
7 एप्रिलपर्यंत देशात करोनाचे जेवढे रूग्ण सापडले त्यात 70 टक्के रूग्ण महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र या नव्या प्रकाराचा हॉटस्पॉट ठरला.
भारतात आतापर्यंत ज्या लसी आल्या आहेत त्यामुळे कदाचित या विषाणू पासून बचाव होऊ शकणार नाही. मात्र लस गंभीर आजारापासून तुम्हाला एक सुरक्षा कवच प्रदान करते.
जॉन्सन अँड जॉन्सनची लस लवकरच भारतात येईल व जास्तीत जास्त लोकांना ती दिली जाण्याची आशा प्रकट करताना राघवन म्हणाले की, गेल्या काही दिवसांत काही पावले उचलण्यात आली आहेत. भविष्यातही असे प्रयत्न करत राहीलो तर त्याची चांगले परिणाम आपल्याला एक दोन आठवड्यात दिसून येतील.