मुंबई – राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. राज्यात आज दिवसभरात 7 हजार 839 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.33 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत एकूण 60,08,750 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात मंगळवारी करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही करोनाबाधितांपेक्षा जास्त होती. तर, आज पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या करोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे.
आज दिवसभरात राज्यात 8 हजार 159 नवीन करोनाबाधित आढळले असून, आज 165 करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,60,68,435 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,37,755 (13.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,51,521 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,795 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 94,745 क्टिव्ह रुग्ण आहेत.