नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे गेल्या वार्षापासून आपण अद्याप सावरू शकलो नाही. मात्र अद्याप विषाणूची नवी रुपे समोरे येत आहोत. आपण दुसरी लाट परतवू पहात आहोत पायाभुत सुविधांवर ताण आला आहे. मात्र तरीही काही प्रमाणात परिस्थिती सामान्य रुप धारण करत आहे. मात्र तरीही जनतेनेन सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपतींनी देशाच्या जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, कोविडच्या साथीमुळे मेटाकुटीला आलेल्या उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार पॅकेजद्वारे मदत करत आहे. गरीबांना मदतीचा हात देत आहे. त्याचवेळी या साथीच्या काळात 23 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची गुंतवणुक ही वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी केली. या साथीने आरोग्याएवढाच परिणाम अथरव्यवस्थेवर केला.
गगनयान मोहीम हे सरकार राबवत आहे. त्यानुसार अंतराळवीरांना परदेशात प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत हे यश संपादन करणारे जगातील चौथे राष्ट्र ठरेल.
आत्मनिर्भर योजने अंतर्गत 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. त्याच बरोबर शेतकरी सन्मान योजना आणि अन्नदाता योजनेतून ग्रामीन विकासाला चालना दिली आहे.
त्यामुळे शहरी आणि ग्रामीण जिवनातील फरक पुर्वीच्या तुलनेत कमी होतआहे. देशातील मुलींनी गेल्या काही वर्षात लक्षणीय यश मिळवले आहे. त्यांचे या यशात मी विकसीत देशाचे चित्र पहात आहे. भारत पर्यावरण क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या आव्हानांना सामोरे जातआहेत. एवढेच नव्हे तर आपण त्या बदलांना सामोरे जात आहोत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण कटीबध्द राहू, असे आवाहन त्यांनी केले.
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी या देशांत लोकशाही रुजेल का? अशी शंका व्यक्त केली होती.मात्र भारताच्या प्राचीन संस्कृतीतच लोकशाहीची मुल्ये रुजली आहेत. गेल्या 75 वर्षात ही रुजलेली लोकशाही जग पहात आहे. या लोकशाहीचे मानक असणारे संसदेचे नवे सभागृह स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सामोर जाताना पूर्ण होईल, असे राष्ट्रपती म्हणाले.