करोनाशी लढा : खबरदारी म्हणून पुढाऱ्यांकडून गावबंद
पवनानगर – “करोना’च्या संसर्गाला वेसण घालण्यासाठी मावळ तालुक्यातील गावपुढाऱ्यांनी शक्कल लढविली आहे. परगावहून येणाऱ्यांना पै-पाहुण्यांना, नागरिकांना “नो-एण्ट्री’ अर्थातच गावबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपाययोजना म्हणून परिसरात येणाऱ्या नागरिकांना गावच्या प्रवेशद्वार जवळच नाकाबंदी करून यापासून सुटका व्हावी यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी कंबर कसली आहे. नाणे, मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळातील ठिकठिकाणी गावबंदी ग्रामस्थांनी केली आहेत. या निर्णर्याचे सर्वस्तरातून स्वागतार्ह असून, यामधून जीवनावश्यक वस्तुंना सूट देण्यात आली आहे.
करोना विषाणूचा संसर्ग ज्यावेगाने पसरत आहे, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पवनमावळातील बहुतांश गावाकडचे लोक कामानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड व शहरी भागात वास्तव्याला होते. परंतु शहरात मोठ्या संख्येने करोनाग्रस्त व संशयित रुग्ण सापडल्याने शहरातून मोठ्या प्रमाणावर गावाकडे लोंढेच्या लोंढे आल्याने गावाकडचे लोक भयभीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकुरसाई, गेव्हंडे खडक, तिकोणा गावातील नागरिकांनी उपाययोजना म्हणून गावाच्या प्रवेशद्वाराच्या जवळच रस्ता बंद करून गावातील नागरिकांना बाहेर जाण्यास बंदी व बाहेरच्या नागरिकांना गावात प्रवेश नाकारला आहे.
सतर्कता म्हणून गर्दी न करता स्वच्छता जंतुनाशक फवारणी आदी उपक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. अजिवली येथे बाहेरून आलेल्या नागरिकांना ग्रामस्थांनी हुसकावले. तर पुण्याहून फिरायला आलेल्या हुल्लडबाज तरुणांना पिटाळून लावले. पवना धरण परिसरात मोठ्या उद्योगपतींचे अलिशान बंगले आहेत.
या बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरातून दहा ते पंधरा दिवस राहण्याच्या दृष्टीने आल्याची चर्चा आहे. याठिकाणी गावातील स्थानिक ग्रामस्थ कामाला आहेत. यामुळे गावाकडे संसर्ग होऊ नये यासाठी बंगल्यावर आलेल्या लोकांची तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मतदान सुरु झाले की उमेदवारांना….. मुंबई, पुणे, तसेंच बाहेरगावी असणारे मतदार आठवतात, आणि त्यावेळी त्यांना कॉल करून स्पेशल आणण्याकरता गाडी पाठवतात ,मात्र आता #कोरोना #महामारी आली पण कोणताच उमेदवाराला आपला बाहेरगावच्या मतदाराची आठवण येतंच नाही या उलट त्यांना गावात येन्यास पण मनाई केली जात आहे.
लाज वाटायला पाहिजे अश्या मानसिक प्रवृत्तीची….