नवी दिल्ली: देशातील करोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन सध्याच्या लॉकडाऊनची मुदत आणखी वाढवण्यात यावी अशी सुचना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की करोनाचा धोका आणि त्याच्या संभाव्य प्रादुर्भावाचा अंदाज याची जर आकडेवारी लक्षात घेतली तर ती भीषण आहे.
पीजीआयएमईआर या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार भारतात सप्टेंबरच्या मध्याला करोना विषाणुंची बाधा सर्वोच्च पातळीवर जाईल आणि देशातील 58 टक्के जनतेला करोनाची बाधा होऊ शकते. डिपार्टमेंट ऑफ कम्यिुनटी मेडिसिनशी संबंधीत ही संस्था चंदीगड स्थित आहे. या संस्थेच्या अंदाजानुसार पंजाबातील 87 टक्के जनता या विषाणुंनी ग्रस्त होऊ शकते अशी शक्यता असून अन्यही राज्यांमध्ये इतकीच भीषण स्थिती उद्भवण्याचा धोका आहे. या स्थितीत प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.