नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना आझाद यांनी पत्राद्वारे याविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आपली नाराजी देखील यावेळी बोलून दाखवली.
मागील काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद हे पक्षावर आणि अंतर्गत कारभारावर नाराज होते, आज अखेर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी एआयसीसी चालवणाऱ्या मंडळींनी काँग्रेसचे वाटोळे केल्याचे म्हटले आहे. एआयसीसीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपली इच्छाशक्ती आणि क्षमता गमावली असल्याचा आरोप देखील आझाद यांनी यावेळी केला.
Ghulam Nabi Azad quits Congress
Read @ANI Story | https://t.co/Bb8HWDzck2#GulamNabiAzad #Congress pic.twitter.com/wMJYXnpYlN
— ANI Digital (@ani_digital) August 26, 2022
दरम्यान, याविषयी बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले,” जड अंत:करणाने हे पाऊल उचलत आहेत. सोनिया गांधींना लिहिलेल्या पाच पानी पत्रात आझाद म्हणाले, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, गुलाम नबी आझाद हे अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते. G-23 गटाच्या माध्यमातून ते काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदलांची मागणी करत राहिले. विशेष म्हणजे काँग्रेसला असा धक्का बसण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही पक्षापासून फारकत घेतली होती. पुढे समाजवादी पक्षाने त्यांना पाठिंबा देऊन राज्यसभेवर पाठवले.