मुंबई – आचारसंहितेच्या उल्लंघनासंबंधी तक्रारींसाठी सुरू केलेल्या ‘सी-व्हिजिल’अँपवर १४ दिवसांत देशभरातून ७९,०००, तर राज्यातून १,४७१ तक्रारी आल्या. सर्वाधिक तक्रारी अनधिकृत होर्डिंग, तर त्यापाठोपाठ पैसे, भेटवस्तू आणि मद्यवाटपासंबंधीच्या आहेत. प्राप्तपैकी ९९% तक्रारींचे निराकरणही करण्यात आले आहे. राज्यात प्रचाराचा धडाका वाढल्यानंतर तक्रारी वाढण्याचा अंदाज आहे.
निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली. निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या घटनांची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल हे मोबाइल अँप सुरू केले आहे. तक्रार दाखल केल्याच्या १०० मिनिटांत त्याचे निराकरण करण्याचा आयाेगाचा दावा आहे. अँपला प्रतिसाद मिळत असून तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे.
अनेक मतदारसंघांत उमेदवार निश्चित नसून प्रचारालाही वेग आलेला नाही. यामुळे ३ एप्रिलपर्यंत केवळ १४९० तक्रारी दाखल झाल्या. पैकी १२७६ (८५.६३%) तक्रारींचे निराकरण केले. एकट्या संभाजीनगरात दाखल ३६ पैकी २८ (७७.७८%) तक्रारी सोडवल्या गेल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील लोकसभेच्या निवडणूकांची घोषणा केल्यानंतर अचारसंहितेची अंबलबजावणी झाली. त्यानंतर राज्यातील ठिक-ठिकाणच्या विकासकामांना खिळ बसली. यासह विविध विकासकामांच्या पाट्यांवरील संकल्पना या शब्दांपुढील नावांवर पडदे लावण्यात आले आहेत.