नगर -जायकवाडी जलाशयातील अतिरिक्त पाण्यामुळे दहिफळ (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व प्रलंबीत भूसंपादनाची कारवाई पूर्ण करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महेश भोसले, गोरख ढाकणे, वजीर सय्यद, गणेश निमसे, शिवाजी जायभाय, जब्बार शेख, गोरख बडे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आठ महिन्यापूर्वी जायकवाडी जलाशय शंभर टक्के भरल्याने त्याचे अतिरिक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्याने पिकांचे मोठे नुकसान असूनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.