लाहोर – भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) व पाकिस्तानचा उद्योन्मुख फलंदाज बाबर आझम यांच्यात लगेचच तुलना करणे योग्य नाही. बाबरला (Babar Azam) अद्याप खूप मोठी मजल मारायची आहे. तो सातत्याने सरस खेळ करत असला तरीही कोहलीशी तुलना केली जावी, अशी कामगिरी अद्याप त्याला करता आलेली नाही. त्यामुळे लगेचच त्यांच्यातील सर्वश्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे, असे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम यांनी व्यक्त केले आहे.
एकाच काळात खेळत असलेल्या खेळाडूंत चाहते तसेच माध्यमे तुलना करतात हे काही नवीन नाही. यापूर्वीही सुनील गावसकर व जावेद मियांदाद, इम्रान खान व कपिल देव, सचिन तेंडुलकर व इंझमाम उल हक अशी तुलनाही होत होती. मात्र, प्रत्येक खेळाडूची शैली वेगळी, त्याची आव्हानेही वेगळी असतात, असेही त्यांनी सांगितले.