वडूज – मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आ. जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने 9 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. याबात 9 जूनला अंतिम सुनावणी होणार आहे.
याबाबत माहिती अशी, मायणीतील भिसे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही, ते जिवंत असल्याचे भासवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी वडूज येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनाची मागणी फेटाळल्याने आ.गोरेंच्यावतीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने त्यांना दि. 9 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.