CM Himanta Biswa Sarma । लोकसभा निवडणुकीसाठी फक्त एक ते दीड महिनाच उरला आहे. अशा स्थितीत देशातील राजकीय वातावरण शिगेला पोहोचले आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे. कारण प्रत्येकाला भाजपमध्ये यायचे आहे,” असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
सर्व उमेदवारांना मी भाजपमध्ये आणणार CM Himanta Biswa Sarma ।
करीमगंज जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित केले त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही, सर्वांना भाजपमध्ये जावे लागेल. एवढंच नाही तर एकाला सोडून मी बाकी सगळ्यांना काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना मी भाजपमध्ये आणणार आहे.” असेही त्यांनी म्हटले.
यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करतील, असे ते म्हणाले. आम्ही अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काम करत आहोत. आज अल्पसंख्याक तरुणांना लाच न देता काम मिळत आहे. अल्पसंख्याकही आम्हाला मतदान करतील. यावेळी भाजप करीमगंज आणि नागाव जागा जिंकेल.” असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपाला पाठिंबा CM Himanta Biswa Sarma ।
गेल्या महिन्यात आसाममधील काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील हिमंता सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी आसामचे मंत्री आणि हिमंता यांचे सहकारी पीयूष हजारिका यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या चार सांगितली होती. चार आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आसामचे संसदीय कामकाज मंत्री पियुष हजारिका म्हणाले की शशिकांत दास, सिद्दीकी अहमद, कमलाख्या पुरकायस्थ आणि बसंत दास हे चार काँग्रेस आमदार आहेत ज्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच आगामी काळात आणखी अनेक लोक आम्हाला साथ देतील असेही सांगितले.