जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीच्या नगरपालिकेला केंद्र शासनाचा देशपातळीवरील स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात कचरामुक्त पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला. जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी पूनम कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देश पातळीवर 25 हजार लोकसंख्या असणाऱ्या शहरात थ्री स्टार रॅंकिंग पुरस्कार जेजुरी नगरपालिकेला मिळाला आहे. शनिवारी (दि. 20) दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जेजुरी नगरपालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात घरोघरी जावून कचऱ्याचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया, जुन्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट, बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी कंपोस्ट खताची निर्मिती, शास्त्रोक्त पद्धतीने भू भरावाची निर्माती, टाकाऊ पासून टिकावू निर्मिती, शहर सुशोभीकरण, व्यावसायिक क्षेत्रात कचरा संकलन आदी उपक्रम राबविण्यात आल्याचे नगरध्यक्षा वीणा सोनवणे व नोडल अधिकारी बाळासाहेब बगाडे यांनी सांगितले.