मुंबई – एनसीबीने आज शाहरूख खान यांच्या चिरंजीवांची म्हणजेच आर्यन खान यांची मादकद्रव्याच्या प्रकरणातून क्लीन चीट देऊन सुटका केल्यानंतर राज्यातील अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यावतीनेही प्रतिक्रीया देण्यात आली असून त्यात त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नवाब मलिक यांच्या कार्यालयातून ट्विटरवर ही प्रतिक्रीया देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, आर्यन खान आणि अन्य पाच जणांना या प्रकरणात एनसीबीनेच क्लीन चीट दिली आहे.
Now that #AryanKhan and 5 others get a clean chit.
Will #NCB take action against #SameerWankhede his team and the private army?
Or will it shield the culprits? @ANI @PTI_News #FarziwadaExposed#NawabMalik#TruthPrevails— Office of Nawab Malik (@OfficeofNM) May 27, 2022
आता या प्रकरणात समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीवर एनसीबी काय कारवाई करणार आहे?, की पुन्हा या आरोपींना पाठीशी घातले जाणार आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. फर्जीवाडा एक्स्पोज्ड, सत्याचा विजय झाला असा हॅश टॅगही त्यांनी चालवला आहे.