कान्हे – कामशेत-पवनानगर रस्त्यालगत येवलेवाडी ओढ्याच्या जवळ येथे उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रमाण वाढत आहे त्यामुळे पवनानगर ते कामशेत प्रवास करणार्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.या कचर्यातील अन्नपदार्थ खाण्यासाठी येणार्या भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. तेथे कचरा टाकणार्या व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
मावळातील अनेक गावांमध्ये कचरकुंड्यांची कमतरता असल्याने वाहनातून जाताना नागरिकांनकडून कचर्याच्या उघड्यावर टाकला जातो. तो कचरा कुजल्याने मोठी दुर्गंधी पसरत आहे. याशिवाय महामार्गावर ठराविक ठिकाणी भटकी कुत्री घुटमळत असल्याचे चित्र दिसत आहे. ही कुत्री रस्त्यावरून अनेकदा दुचाकीस्वारांचच्या मागे लागल्याने अपघात होतात. शहरातील मनुष्यवस्तीच्या आसपास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
ही कुत्री अन्नपदार्थ शोधताना कचरा अस्ताव्यस्त करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. दौडे कॉलनी येवलेवाडी फाटा येथील ओढ्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यावर प्रभावी उपाययोजान करण्याची मागणी नागरिक करत आहेत.