मुंबई: लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वर येथे जाण्यास वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी परवानगीचे पत्र देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवासी यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारच्या आशिर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नसल्याचा आरोप करत अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधु यांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रवासी पास दणारे विशेष गृहसचिव आमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आले आहे. यावर अशा प्रकारचा पास कोणताही अधिकारी आपल्या भरवश्यावर देऊ शकत नाही.
जोपर्यंत सराकरमधील किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोक आशिर्वाद देत नाही किंवा इशारा देत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडणे शक्य नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. म्हणूनच अमिताभ गुप्ता यांनी क्लिनचिट मिळाल्याचे ते म्हणाले.