मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे पक्षातील बंड आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यातून त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडले आहे. या मुलाखतीचा टीझर काल राऊत यांनी शेअर केल्यानंतर या टीझरवरुनच निलेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. निलेश राणेंनी यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये आणि सध्याच्या मुलाखतीमधील फरक दाखवणारा एक फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे.
तर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. “मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या… पण तिथे वसूली शिवाय काहीच नव्हतं…” असं म्हणत चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे.
काय आहे चित्रा वाघ यांचे ट्विट
मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या….
पण तिथे वसूली शिवाय काहीच नव्हतं…@Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @Devendra_Office @BJP4Maharashtra @BJP4Mumbai— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 26, 2022