मुंबई – कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी तीन दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पाणी शिरलं असून घरे आणि बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. त्यात आता चिपळूनमध्ये 8 करोनाग्रस्तांना ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे समोर आल आहे.
मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. गुरुवारी पहाटेपासून चिपळूणमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. यामुळे चिपळूणमध्ये आतापर्यं. ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
येथील अपरांत कोविड हॉस्पिटल देखील पुराच्या विळख्यात अडकले. या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार सुरू होती. या कोविड रुग्णालयात 21 रुग्णांवर उपचार सुरू होती. यामध्ये काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलमधील 8 करोना रुग्णांचं ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान पूरस्थितीमुळे चिपळूणमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे चार्जिंग अभावी अनेकांचे फोन बंद आहेत. यामुळेच अपरांत हॉस्पिटलचा संपर्क तुटला होता. यानंतर रुग्णालयात नक्की काय झालं हे कळलं नाही. मात्र 8 करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.