मुंबई: मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. दरम्यान, ईडीकडून त्यांची अनेक तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यन, आता त्यांच्या अटकेच्या कारवाईवर अनेक राजकीय नेत्यानाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
भाजप नेते राम कदम यांनी देखील आपली प्रतिक्रिया आहे. तसेच “संजय राऊत याना देवानेच ही शिक्षा दिली आहे”, असा टोला त्यांनी लगावला.
उखाड़ दिया .. ।
बताये ..
यह किसने ,
किसको कहा था ?
इसलिये कहावत है .
चिंगारी खेल बड़ा बुरा होता है .. औरों के घरों में आग लगने का सपना ….
खुद के ही घर में खरा होता है ..
यह ईश्वरीय दंड है
नये बदले हुए भारत के क़ानून तथा सशक्त
लोकतंत्र कीं ताक़त है ,— Ram Kadam (@ramkadam) August 1, 2022
राम कदम यांनी आज एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, “उखाड़ दिया .. बताये .. यह किसने , किसको कहा था ? इसलिये कहावत है ..”चिंगारी खेल बड़ा बुरा होता है, औरों के घरों में आग लगने का सपना, खुद के ही घर में खरा होता है”, असे म्हणत संजय राऊत यांना देवानेच शिक्षा दिली असल्याचे म्हटले आहेत. तसेच नव्याने बदललेले भारताचे कायदे आणि मजबूत लोकशाहीची ताकद आहे. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
संजय राऊत यांना सहा तासांहून अधिक चौकशीनंतर रविवारी मध्यरात्री ईडीने अटक करण्यात आली आहे . अधिकार्यांनी दावा केला की राऊत तपासात सहकार्य करत नव्हते, त्यामुळे त्याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत 12:05 वाजता ताब्यात घेण्यात आले.