छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथील राड्या प्रकरणात अटकेत असलेल्या आठ आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या ओहर गावात 31 मार्च रोजी दोन गटात वाद झाला होता. वादाचं रुपांतर दगडफेकीत झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत आरोपींची धरपकड केली. या कारवाईत अटक केलेल्या आठ आरोपींनी नियमित जामिनीसाठी अर्ज केला होता. मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी जामीन अर्ज फेटाळला. यावेळी सरकारी वकिलांनी जामीन देण्यावर आक्षेप घेत, आरोपींच्या साथीदारांना अटक करायची आहे.
गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा दंगल उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत सहाय्यक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. दरम्यान त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी दिले आहे.