अमृतसर – येत्या 2 मे पासून पंजाबमधील सर्व सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडतील. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती दिली. ही प्रणाली 2 मे ते 15 जुलैपर्यंत लागू राहणार आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे एकीकडे विजेची सर्वाधिक मागणी कमी होईल, तर दुसरीकडे उन्हाळा शिगेला पोहोचला असताना कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक आपापल्या घरी जातील. हे पाऊल विजेची सर्वाधिक मागणी कमी करेल.
भगवंत मान यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सर्वाधिक मागणी 300 ते 350 मेगावॅटने कमी होण्याची शक्यता आहे. दुपारी दीड ते पाच वाजेपर्यंत कमाल भारनियमन असल्याचे वीज मंडळाचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांशी बोलून हा निर्णय घेण्यात आला आहे. मान यांच्या म्हणण्यानुसार परदेशात ही पद्धत अवलंबली जाते, मात्र भारतात प्रथमच पंजाबमध्ये ही पद्धत वापरली जात आहे.