Chhagan Bhujbal। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यातच त्यांनी सरकार आपली मागणी मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण करणार असे म्हटले. ‘मनोज जरांगे यांना औषोधोपचार घ्यायला सांगा…’, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या. त्यानुसार त्यांनी उपचारास होकार दिला आहे.
मात्र, त्यापूर्वी मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जरांगेंनी उपचार घेण्यास होकार दिलाय. जरांगेनी त्यांचे सहकारी आणि डॉक्टरांच्या विनंतीवरुन उपचारांना होकार दिला. । Chhagan Bhujbal
दरम्यान, आज जरांगे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांनी लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. तर, दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याउपोषणावरुन त्यांच्यावर पुन्हा उपरोधीक टीका केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ‘कोणी महाराज येतात, कोणी मंत्री येतात, कोणी राजे येतात, मग त्यांना पाणी घ्यावंच लागते. परत पाणी सोडावे लागते. परत परत ते चालूच असतं. जोपर्यंत आहेत, तुम्ही आहात तोपर्यंत हा कार्यक्रम चालूच राहील मलातरी तो कार्यक्रम थांबेल असे वाटत नाही अशी टीका भुजबळ यांनी जरांगे यांच्या उपोषणावर केली आहे.
कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही…. Chhagan Bhujbal
मनोज जरांगे पाटील मोठा नेता आहे. तिथे झोपणार अन् तिथून सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झाले पाहिजे…अरे हे काय चाललंय काय, दुकाने बंद करा, गाड्या जाळा. हे काय टोळ्यांचे राज्य आहे का ? बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेले हे लोकशाहीचे महाराष्ट्र राज्य आहे. । Chhagan Bhujbal
हे मंत्र्यांनी अन् पोलिसांनी दाखवून दिले पाहिजे, कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. कायदा जर कुणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. मग तो लहान नेता असो वा मोठा नेता असो किंवा कोणत्याही समाजाचा नेता असो अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.