मुंबई – शिर्षक वाचून धक्का बसला असेल ना, पण हे खरे आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या आयपीएल स्पर्धेत लढतीत चेन्नई सुपर किंग्जला मैदानावर फवारण्यात आलेल्या किटकनाशकाचा फटका बसला. या सामन्यात धावांचा पाठलाग करण्याचे चेन्नईचे मनसुबे होते कारण खेळपट्टीवर संध्याकाळी पडत असलेले दव गोलंदाजांना दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मारक ठरते. मात्र, या सामन्यात तसे काही घडले नाही उलट चेन्नईलाच पराभवाचा साना करावा लागला.
पंजाब विरूद्धच्या सामन्यात दव फॅक्टर जाणवलाच नाही. ब्रेबॉन स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफने या सामन्यापूर्वी मैदानावरील हिरवळीवर दवबिंदू तयार होऊ नयेत म्हणून दवबिंदू विरोधी औषध आसपा 80 या रासायनिक किटकनाशक द्रव्याचा वापर केला. त्यामुळे दुसऱ्या डावात पंजाबच्या गोलदाजांना चेंडूवरील आपली ग्रीप भक्कम ठेवता आली.
याचा फटका चेन्नईला बसला. या किटकनाशकाच्या फवारणीमुळे दव फारसे तयार होत नाही हे चेन्नईला उमगलेच नाही. खरेतर त्यांचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मुंबईतील वातावरणात खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तसेच त्याने येथील सर्व मैदानांवर सामने खेळले आहेत. ही फवारणी केली की दव फॅक्टरचा त्रास होत नाही हे त्याने कसे ओळखळे नाही असा सवाल आता चेन्नई संघाचे चाहते चेन्नईच्या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रीयेत सवाल करत आहेत.
चेन्नईने सलग तीन पराभव पत्करले असून यातील दोनवेळा त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी केली होती. म्हणून या तीसऱ्या सामन्यांत त्यांनी धावांचा पाठलाग करण्याचे ठरवले पण मैदानावर फवारण्यात आलेल्या या किटकनाशकाने त्यांना हा सामनाही जिंकून दिला नाही. पहिल्यांदा फलंदाजी केलेले दोन्ही सामने चेन्नईने गमावले होते व त्यात मैदानावरील दवामुळे त्यांच्या गोलंदाजांना चेंडू ग्रीप करता येत नव्हता. हेच किटकनाशक या सामन्यांपूर्वी का फवारले गेले नाही, असाही सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे.