मुंबई – आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले की, देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले.
LIVE |📍 कोराडी, नागपूर | माध्यमांशी संवाद (19/08/23)
https://t.co/Jm0bRkYuDC— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 19, 2023
‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा! असेही लिहिण्यात आले आहे.
यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बावनकुळे म्हणाले, सामना वृत्तपत्राच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहोत. मुंबईचे नेते आणि कार्यकर्त्यांचा, सामना वृत्तपत्राच्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा विचार सुरु आहे. दोन्ही प्रकारच्या लढाईची आमची तयारी सुरु आहे. स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन जे लिहिलं जातंय. ते खपू घेण्यासारखं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत, असं बावनकुळे म्हणाले आहे.