मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुळापासून हाललं आहे. शिंदे गटात सेनेचे ३९ आमदार असून याचाच दाखल देत विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीची मागणी राज्यपालांकडे मंगळवारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील बहुमत चाचणीचाच निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे.
Those (rebel Shiv Sena MLAs) who were reaching Mumbai tomorrow, I urge them not to come tomorrow, they should come on the day of oath-taking: Maharashtra BJP chief Chandrakant Patil pic.twitter.com/pXDDAQ35pM
— ANI (@ANI) June 29, 2022
आता राज्यात सत्ताबदल होणार आहे. त्यातून सरकार स्थापण्याचा भाजपचा मार्ग मोकळा होणार आहे. आता शिवसेनेतील बंडखोर गटासह नव्या सरकारची रचना कशी असणार याविषयी उत्सुकता असेल.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की,’जे (शिवसेनेचे बंडखोर आमदार) उद्या मुंबईत येणार आहेत त्यांना मी आवाहन करतो की उद्या त्यांनी येऊ नये. त्यांनी शपथविधी असेल त्या दिवशी यावं,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. ते पुढे म्हणाले,’शपथविधी कधी होईल यासंदर्भातील काही निर्णय झालेला नाही असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील बंडखोर आमदार गोव्यामध्ये पोहचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बंडखोर आमदारांसाठी 70 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यानंतर सर्व आमदार मुंबईला रवाना होतील. महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर ते थेट विधानसभेत जाणार आहेत.