मुंबई – महाराष्ट्राच राजकारण सध्या ईडी आणि आयकर विभागांच्या कारवायांमुळे ढवळून निघालं आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या निर्मितीतील महत्त्वपूर्ण असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तसेच ईडीच्या कारवायांवरून राज्यातील भाजप नेत्यांची खिल्ली उडवली.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाईसाठी करण्यात येत असून आता भाजपाने थेट कोल्हापुरातील मतदारांनाच “ईडी’ची धमकी दिल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.
शरद पवार म्हणाले की, कोल्हापुरात पोटनिवडणूक सुरू आहे. त्या दिवशी मी कोल्हापुरात होतो. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांनी ईडीच्या चौकशीची धमकी दिली.
याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही टीका केली होते. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल, अशी जाहीर धमकीच दिली, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं पटोले म्हणाले होते.