नवी दिल्ली – दिल्लीतील सर्व झोपडपट्टांच्या विरोधात केंद्र सरकारने निर्दयी कारवाई करण्याचा आदेश दिला असून या झोपडीवासियांना उठवून तेथील जागा आपल्या ताब्यात घेण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे असा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी केंद्र सरकारवर दिल्लीतील सर्व झोपडीवासियांना साफ करण्याची योजना आखली असल्याचा दावा केला.
आज दिल्लीत या संबंधात आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, भाजपने जमीन मालकी संस्थांसोबत बैठक घेतली आणि त्यांना राष्ट्रीय राजधानीतील झोपडपट्ट्या पूर्णपणे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार तरुण कपूर यांनी जमीन मालकीच्या सर्व एजन्सींची बैठक घेतली ज्यामध्ये डीडीए. एल ॲन्ड डी रेल्वे, आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते, त्यात दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्यांपासून मुक्ती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले,” असे अतिशी म्हणाल्या. आम्ही काही महिन्यांपासून हे पाहत आहोत की, जिथे जिथे केंद्र सरकारची जमीन आहे, त्या भागातील सर्व झोपडपट्ट्या हटवल्या जात आहेत. नोव्हेंबरमध्ये, रेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन दरम्यान, मथुरेतील सुंदर नर्सरी नष्ट करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारच्याअधिकाऱ्यांनीच ही नर्सरी नष्ट केली. जी २० आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झोपडपट्ट्यांचा परिसर हिरव्या चादरीने झाकल्याबद्दल आतिशी यांनी भाजपचीही खिल्ली उडवली.
त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीतील झोपडपट्टी नको आहे. पण जी २० दरम्यान झोपडपट्ट्यांना हिरव्या चादरीने झाकण्यात आले होते कारण पंतप्रधान मोदींना झोपडपट्ट्या नको आहेत आणि आता त्या पूर्णपणे काढून टाकण्याची योजना ते आखत आहेत,असे अतिशी म्हणाल्या.
आप नेते आतिशी यांच्या विधानाचे समर्थन करताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, “झुग्गी-झोपरी क्लस्टर्स हे समाजाचे वास्तव आहे. जर कोणतीही झोपडपट्टी पाडली गेली, तर त्यात राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची आहे.” “एप्रिल 2020 मध्ये, सर्वोच्च सरोजिनी नगरच्या झोपडपट्ट्या काढून टाकल्या त्यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला लोकांचे पुनर्वसन करण्यास सांगितले होते. भाजपने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत झोपडीवासियांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते परंतु निवडणुकीनंतर त्यांनी झोपडपट्ट्या पाडण्याचे आदेश दिले आहेत, ते झोपडपट्ट्यांना बुलडोझर फिरवत आहेत असे त्या म्हणाल्या.