मुंबई – केंद्र सरकार केवळ मुंबईलाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना पटोले म्हणाले की, “मुंबईतील फायनान्शियल हब गुजरातला हस्तांतरित करण्यात आले आहे. आमचे व्यावसायिक उपक्रमही गुजरातमध्ये स्थलांतरीत केले जात आहेत.
स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य केंद्र गुजरातमध्ये नेले जात आहे.या प्रयत्त्नांतून केंद्र सरकार मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उद्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, आणि त्यावर ते अंतिम निर्णय लवकरच घेतील. असं देखील ते यावेळी म्हणाले.