नगर – महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महिन्यात शेतकऱ्यांना कोणती मदत केली. सरकारने भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकरी विरोधी धोरण राबविले. कशा पध्दतीने शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे कार्य केले याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.
कांद्याच्या निर्यातबंदी हटविण्याची मागणी जोर धरु लागत असताना, केंद्र सरकारला लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महीन्यात शेतकऱ्यांना कोणती मदत केली? असल्याचा सवाल माजी मंत्री विखे यांनी उपस्थित केला आहे. याला उत्तर देत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लहामगे यांनी स्व. विठ्ठलराव विखे पटील व बाळासाहेब विखे पाटील तसेच विखे पाटील कुटुंबीयांची नाळ शेतकऱ्यांशी जोडली गेलेली आहे.
दुध प्रश्नाप्रमाणे महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. त्याप्रमाणे कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी विखे यांनी केंद्र सरकार विरोधात देखील आंदोलन करण्याची गरज होती. शेतकऱ्यांना त्यांच्याप्रती एक वेगळी आस्था निर्माण झाली असती.