मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य केले होते. राज ठाकरे म्हणाले होते, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून टीका केली जात आहे. याचवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
एकीकडे मनसेने भोंग्याचा विषय लावून धरला असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आणखी आक्षेप मांडला आहे. त्यांनी ट्विट केले आहे करत प्रश्न उपस्थित केला आहे की, जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत. मात्र, मशिदींमध्ये CCTV आहेत का?, असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे ट्विट
प्रार्थना स्थळांमध्ये CCTV यंत्रणा का असू नये?#MNSAdhikrut pic.twitter.com/Ml4lNti4H2
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 20, 2022