जामखेड (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तंत्र व उच्च शिक्षण विभागांतर्गत येणार्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करून राज्यातील विद्यार्थी व पालकांना शासनाने दिलासा दिला. त्याच प्रमाणे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी घेण्यात येणार्या नीट युजी व महासीईटी परीक्षा रद्द करून विद्यार्थी व पालकांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नीट युजी व महा सीईटी परीक्षेवेळी परीक्षा केंद्रावर होणारी विद्यार्थी व पालकांची संभाव्य गर्दी व त्या माध्यमातून होणारा कोरोनाचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी घेण्यात येणार्या नीट युजी व महा सीईटी परीक्षेबाबत शासनाने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.कोरोनाचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सदर परीक्षा रद्द करून बारावीच्या मार्कांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.
“कोरोनाचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव पाहता नीट युजी व महा सीईटी परीक्ष परीक्षे ची तयारी करत असलेले विद्यार्थी व पालक प्रचंड तणावात आहेत. सदर परीक्षे वेळी होणारी प्रचंड गर्दी पाहता अशा परिस्थितीत युजी नीट व महासीईटी परीक्षा घेणे व्यावहारिक होणार नाही. तरी शासनाने नीट युजी व महा सीईटी परीक्षा या शैक्षणिक वर्षासाठी रद्द करून या वर्षाची प्रवेश प्रक्रिया बारावीच्या मार्कांच्या आधारे राबविली पाहिजे.
-डॉ.भास्कर मोरे
सद्य परिस्थितीत युजी नीट व महा सीईटी परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या जीवाचा विचार करून नीट युजी व महा सीईटी परीक्षा रद्द करून बारावीच्या मार्कांच्या आधारे शैक्षणिक वर्ष 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया राबविणे योग्य राहील. त्यासाठी नीट युजी व महा सीईटी परीक्ष रद्द करून शैक्षणिक वर्ष 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया बारावीच्या मार्कांच्या आधारे राबविण्यात यावी अशी विनंती डॉ भास्कर मोरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
“कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या सद्य परिस्थितीत नीट युजी व महा सीईटी परीक्षा घेणे कठीण आहे.परीक्षा केंद्रावर होणारी गर्दी व त्यामाध्यमातून कोरोनाचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव पाहता सदर परीक्षा रद्द करून बारावीच्या निकालाच्या आधारे या वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविली पाहिजे.
-डॉ.विशाल प्रकाश देशमुख, जामखेड जिल्हा अहमदनगर.
त्यासाठी मा. आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,महाराष्ट्र शासन,मुंबई, मा.संचालक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र शासन, मुंबई, मा.संचालक,आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन,मुंबई यांचे सह संबंधितांनी तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी डॉ. भास्कर मोरे यांनी केली आहे.