खालापूर, (वार्ताहर) – शिवजयंतीचे औचित्य साधून शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने खालापूरात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीत मथुर–सोन्याने मैदान गाजवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 200 हून अधिक बैलगाड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या बैलगाडा मालकांना सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, जांभिवलीचे माजी सरपंच दिनेश घाडगे व सरपंच ग्रुप यांच्या पुढाकारातून आणि भारतीय बैलगाडा संघटनेच्या मान्यतेने 18 फेब्रूवारी रोजी नारंगी येथील केसरी मैदानात बैलगाडा शर्यत पार पडली.
याप्रसंगी उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, भाई शिंदे, नवीन घाटवल, एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे, सुवर्णा जोशी, एस.एम.पाटील, आत्माराम पाटील, उमेश गावंड, रमेश पाटील, निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, महेश पाटील, उत्तम भोईर, नितीन पाटील, अविनाश आमले, दिनेश घाडगे, प्रविण पाटील, अशोक मराजगे, अनिता पाटील, शैला भगत, सुदाम पवाळी, बाबू घारे, अॅड.संपत हडप, पंढरीनाथ राऊत, बाजीराव दळवी, योगेश दाभाडे, समीर साळोखे, योगेश थोरवे, योगेश घोलप आदी उपस्थितीत होते.
बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम तीन क्रमांकांना दुचाकी बक्षीस ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांक विर संदेश देशमुख, द्वितीय क्रमांक सममरा प्रतीक मढवी, तृतीय क्रमांक ऋषिकेश मारुती पाटील यांच्या बैलजोडीने पटकावला. त्यांना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.