पुसेसावळी,(प्रतिनिधी)- बैलगाडी शर्यत फक्त मनोरंजनाची गोष्ट नसून ग्रामीण भागातील यात्रा जत्रा, उरुस, महोत्सव यामधे बैलाच्या शर्यती हे मुख्य आकर्षण असते. गावपातळीवर बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण परिसराच्या अर्थकारणाला बळ मिळत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
चोराडे (ता. खटाव) येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यती शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुहास पिसाळ, सरपंच कृष्णत पिसाळ, श्रीरंग पिसाळ, विजय पिसाळ, सुदाम पिसाळ, नवनाथ पो. पिसाळ, प्रथमेश पिसाळ उपस्थित होते. सारंग पाटील म्हणाले, बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळावी म्हणून खा. श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने संसदेत आवाज उठवला आहे,
आयोजकांनीही शासनाच्या अटीस अधीन राहून शर्यती भरविल्या पाहिजेत, शर्यतीमुळे कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होत असून छोटी मोठी दुकाने, शेतीपयोगी वस्तू विकणारे, हाॅटेल्स, वाहतूक करणारे, वाजंत्री यासह अनेक व्यावसायिक शर्यतीच्या अवतीभवती जोडले जात आहेत. त्यातूनच ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळत आहे. यावेळी धनाजी पवार, नारायण पिसाळ, आबासो काशीद, महिंद्र पिसाळ, संदीप तात्या पिसाळ, मच्छिंद्र पिसाळ, युवराज पिसाळ, मंगेश पिसाळ, निवास पिसाळ, भाऊसो मदने, संजय मदने, बैलगाडा शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.