पुणे – श्री वीरशैव पट्टशाली लिंगायत कोष्टी समाज संस्था व महिला मंडळ पुणे तर्फे आयोजित होणारा राज्यस्तरीय व द्विवार्षिक लिंगायत समाजातील विवाहयोग्य व विवाहोत्सुक मुलां-मुलीं साठीचा “वधू-वर-पालक परिचय मेळावा”, सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे येथे, ८ मे, २०२२ रोजी पार पडला.या मेळाव्यासाठी औरंगाबाद येथील लिंगायत समाज बांधव डॉ.संजय निंगाप्पा हारके (औरंगाबाद येथील इन्स्टिटयूट ऑफ बायोसायन्स अँड टेकनॉलॉजि चे प्रोफेसर व डायरेक्टर) अध्यक्ष म्हणून आणि पुणे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ् डॉ.दत्तात्रय नारायण जोशी (MBBS, DOMS) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
या मेळाव्यासाठी फक्त महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर शेजारील राज्यांमधील लिंगायत समाजातील विवाहोत्सुक मुले व मुली, त्यांचे पालक नातेवाईक व इतर लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे सरचिटणीस श्री राजेंद्र दाभोळे यांनी प्रास्ताविक केले आणि संस्थेचे अध्यक्ष श्री शशिकांत मेणसे यांनी संस्थेतर्फे असे मेळावे आयोजित करण्यामागची संस्थेची भावना व्यक्त केली.
डॉ हारके व डॉ जोशी यांनी जमलेल्या समाज बांधवांना संबोधित करताना आजच्या काळासाठी अशा मेळाव्यांचे असणारे महत्व विशद केले आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी गरजेचे असलेले सामाजिक व वैद्यकीय महत्व हि विशद केले. त्यासाठी कशी काळजी घ्यावी हे हि अभ्यासू पद्धतीने पटवून दिले . गेली कित्तेक वर्षे असे सामाजिक उपक्रम राबवित असल्या बद्दल संस्थेच्या विश्वस्तांचे कौतुक केले आणि अशा मोठ्या व नेटक्या पद्धतीनी नियोजन केलेल्या सामाजिक कार्यक्रमाचा त्यांना भाग करून घेतल्या बद्दल संस्थेचे त्यांनी आभारही मानले.
१९७४ मध्ये समाजातील ४-५ समविचारी समाज बांधवांनी सुरु केलेली हि संस्था लिंगायत समाज बांधवांच्यासाठी असे मेळावे तर आयोजित करतेच आहे, परंतु लिंगायत समाजाशिवाय इतर समाजांसाठी सुद्धा उपयोगी होतील असे वेगवेगळी सामाजिक कामे त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, नदी किनारे/गड-किल्ले/मंदिरे यांची साफसफाई, वृक्षारोपण, गरजू सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करत असते.
नजिकच्या भविष्यात लिंगायत समाज बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळे आणि लिंगायत समाजातीलच उच्च शिक्षित व प्रशिक्षित बांधवांच्या मदतीने गरजू विद्यार्थी व तरुण-तरूणींसाठी विशेष शिक्षण वर्ग, तर वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक बांधवांच्या मदतीने नोकरी/व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री अजगुंडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.