अहमदनगर – देशभरात सर्वांचे श्रद्धस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा ट्रस्ट बाबतचा महत्वाचा निर्णय समोर आला आहे. शिर्डीचे साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यासोबतच या खंडपीठाने राज्य सरकारला काही महत्वाचे निर्देश देकील दिले आहेत. ज्यात पुढील २ महिन्यांमध्ये नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करा असे सांगण्यात आले आहे.
खंडपीठाने विश्वस्थ मंडळ बरखास्त केल्यानंतर पुढील कामकाज त्रिसदस्यीय समिती पाहिलं असं सांगितलं होत. त्रिसदस्यीस समितीतील सदस्य कोणतेही आर्थिक, धोरणात्मक निर्णय घेणार नाही, असेही न्यायलयाने म्हटलं आहे. जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश या त्रीसदस्यीय समितीत करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने १६ विश्वस्थांची नेमणूक संस्थानावर केली होती. याप्रकरणी माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ही नेमणूक नियमाला धरून नसल्याचे म्हंटले होते. त्यानंतर न्यायालयाने आज यासंदर्भात निर्णय दिला आहे.