लखनौ – भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी काल सहा ठिकाणाहून एकाच वेळी जनविश्वास यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा उत्तरप्रदेशातील सर्व 403 मतदार संघांमध्ये प्रचार करणार आहे. ती यात्रा 2 जानेवारी पर्यंत चालणार आहे. आंबेडकरनगर मधून सुरू करण्यात आलेल्या यात्रेला भाजप अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी प्रारंभ केला. ती यात्रा लखनौच्या काकोरी पर्यंत जाईल.
योगी अदित्यनाथ यांनी मथुरेतून निघालेल्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला त्याचा समारोप बरेलीत होणार आहे. बिजनौर येथून निघालेल्या यात्रेला परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी झेंडा दाखवला ती यात्रा रामपुर पर्यंत जाणार आहे. झांशी येथून सुरू झालेल्या यात्रेला संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला ती यात्रा कानपुरला समाप्त होणार आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बलिया पासून सुरू झालेल्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला ती यात्रा बस्ती येथे समाप्त होणार आहे. स्मृती इराणी यांनी गाझीपुरहून निघालेल्या यात्रेचे उद्घाटन केले ती यात्रा अमेठीत समाप्त होणार आहे.