शरद पवारांनी व्यक्त केली शंका
मुंबई – लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भारतीय जनता पक्ष मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगड या राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका हरला असावा अशी शंका माझ्या मनात पहिल्यापासूनच होती असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी ही शंका व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम मशिन्स आणि त्यांची संख्या या विषयी माझ्या मनात पहिल्यापासूनच शंका होती. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये भाजपची सत्ता असताना भाजपचा पराभव झाला. आणि कॉंग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाची निवडणूक जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती.
पवार यांनी दुसऱ्या एका ट्विटर मध्ये म्हटले आहे की, निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे इतका विचार करण्यात आला. माझे मत बरोबर गेले आहे की नाही या बाबत लोकांच्या मनात शंका आहे. देशात लोकांच्या मनात या आधी कधी शंका आली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे असे पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी ईव्हीएम विषयी अशी स्पष्ट शंका व्यक्त करणारे ट्विट पहिल्यादांच केले आहे.