नवी दिल्ली – देशात सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा राडा सुरु असल्याचे दिसत आहे. कारण कर्नाटकच्या कॉलेजमधील एका व्हिडीओने देशात नवीन वादळ निर्माण केले असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत एख तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना तेवढ्याच धाडसाने उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान,हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्जही दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने निकाल येईपर्यंत शाळा-महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यास बंदी घातली, तेव्हा त्याविरोधात एका गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यातच आता एआयएमआयएमी चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
ते म्हणाले,’बुरखा-हिजाब घालणाऱ्यांकडे भाजपने मते मागू नयेत’ असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. बुरखा आणि हिजाब हे इस्लामचे अत्यावश्यक अंग आहेत. मुस्लिम मुलींना हिजाब घातल्याबद्दल शिक्षणापासून का रोखले जाते? सरकारचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा आहे, मग मुस्लिम मुलींना शिक्षणापासून रोखणे योग्य नाही. अस ते म्हणाले.