मुंबई – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधींच्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मनसेने राहुल गांधींची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे.
यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि राज ठाकरे यांना खरे देशप्रेमी असाल तर सावरकरांच्या ज्या पत्रावरून वाद होतोय, त्यावर बसून एकदा चर्चा करा, पत्राचं उत्तर द्या. असं आवाहन केलं आहे.
60 रुपये महिना त्यांना पेंशन मिळत होती. आता इंग्रज कुणाला पेंशन देतील? स्वातंत्र्यवीराला तर देणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं वैचारिक चर्चा करा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.
ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’खरे देशप्रेमी असाल तर सावरकरांच्या ज्या पत्रावरून वाद होतोय, त्यावर बसून एकदा चर्चा करा, पत्राचं उत्तर द्या, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि राज ठाकरे यांना केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांकडून पेंशन घेत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजप आणि मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. मात्र सावरकर यांनीच लिहिलेले पत्र दाखवत काँग्रेस नेत्यांनी भाजपाला प्रश्न विचारला आहे.