लखनोै – नितीशकुमार आणि राजदचे तेजस्वी यादव हे सध्या विरोधी पक्षांची राष्ट्रव्यापी आघाडी उघडण्याच्या प्रयत्नांत असून त्यांनी या संबंधात उत्तरप्रदेशातीाल समाजादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, देशातील लोक विविध प्रश्नांनी त्रस्त आहेत, त्यांच्या हितासाठी आम्हीं विरोधकांनी एकत्र यायचे ठरवले आहे.
देशहितासाठी आणि लोकांच्या हितासाठी भाजपला केंद्रातून सत्तेवरून घालवून दिले पाहिजे त्यासाठीच्या प्रयत्नांना आपण साथ देऊ असेहीं अखिलेश यादव यांनी सांगितले. विरोधी पक्ष एकत्रितपणे जो काही निर्णय घेतील तो देश हिताचाच असेल असेही त्यांनी म्हटले आहे. असेच विधान या चर्चेनंतर नितीशकुमार यांनी केले.
ते म्हणाले की आगामी संसदीय निवडणुकांच्या संबंधात आमच्यात व्यापक चर्चा झाली.अखिलेश यांना भेटण्यापुर्वी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यानीं कालच कोलकात्यात तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. त्यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या ऐक्याला समर्थन दिले आहे.