मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. उद्या सकाळी 11 पर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. यामुळे ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता ही लढाई चांगलीच अटीतटीची होणार आहे.
या निवडणूकीच्या प्रश्नांवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले,’जो उमेदवार असेल तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. पण ती जागा कोण लढवणार याबाबतचा निर्णय शिंदे – फडणवीस साहेब एकत्र बसून घेतील. लवकरच युतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करु. आमच्यामध्ये कधीही भेदभाव राहिलेला नाही. आमच्यासाठी भाजपने मुख्यमंत्रीपद सोडलं, त्यामुळे उद्या कदाचित ती जागा भाजपला सोडली तर गेली तर खूप मोठं काही झालं असं सुद्धा उद्या विरोधकांची बोलण्याची तयारी असणार आहे.
पण ते या गोष्टीची जाणिव ठेवत नाहीत की दुप्पट संख्याबळ असतानाही त्यांनी आमचा मुख्यमंत्री दिला आहे. एकदिलाने महाराष्ट्रात राज्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो शिंदे-फडणवीस एकत्र बसून घेतील. मी असं अजिबात म्हणतं नाही की शिंदे साहेबांना ही जागा लढायची नाही, किंवा फडणवीस साहेब लढविणार आहेत, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ते एकत्र बसून घेतली. असेही ते म्हणाले आहे.