मुंबई – शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे.त्यात अंधेरीत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपसह उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निलेश राणेंनी आता या पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे. तसेच राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला उत्तर देत राणे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कामधंदे सोडलेत की काय असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठींबा दिलाय. या दरम्यान राष्ट्रवादी नेत्यांनी भाजवर टीका केली होती या टीकेला आता निलेश राणे यांनी उत्तर दिलय. सत्ता गेल्याने राष्ट्रवादीचे नेते बेरोजगार झाले आहेत त्यांच्याकडे कामधंदे नाहीत म्हणून संपूर्ण दिवसभर भाजप काय काम करते याकडे लक्ष देतात अशा शब्दात राणे यांनी निशाणा साधला आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
नेमकं काय म्हणाले निलेश राणे यावेळी
नारायण राणे यांना मुंबईमध्ये मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी ते पार पाडतील आणि मुंबईवर भाजपचा झेंडा लागले असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केली.राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील हवेत गोळीबार करत असतात, असं निलेश राणे म्हणाले. तर सूडबुद्धीने गुन्हे दाखल झाले आहेत या भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपावर बोलताना राणे म्हणाले,भास्कर जाधव कार्टून आहे, तळ कोकणात आम्ही त्याला बैलचं म्हणतो,तो उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी बोलत असल्याची टीका यावेळी राणेंनी केली.