कोलकता – पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भाजप राज्यात दंगली भडकावू शकते, त्यामुळे त्यांना सतर्क राहावे लागेल. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप डाव्यांच्या मार्गावर आहे. दिघा येथील जाहीर सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली.
बंगालच्या लोकांना हिंसाचार आवडत नाही हे त्यांना (भाजप) समजत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. दंगल ही बंगालची संस्कृती नाही. आम्ही दंगा करत नाही. भाजप दंगल भडकावू शकते, त्यामुळे मला सावध राहावे लागेल. सामान्य जनता दंगल करत नाही, भाजपला स्वबळावर जमत नाही तेव्हा दंगलीसाठी बाहेरून लोक आणतात. रामनवमीच्या मिरवणुकीत एका तरुणाने शस्त्र उगारल्यावर ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हे पूर्वी डावेही करायचे. तुम्ही लोक डाव्यांचा अतिरेक विसरलात का? नंदीग्राम, खेजुरी, कोलाघाट, तामलुक येथे काय झाले ते विसरलात का? माकप मोठमोठे दावे करत असे, आज भाजपही माकपकडून शिकून त्याच मार्गावर आहे.