नगर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थित नुकतेच मध्य रेल्वे विभागाच्या वतीने ठाणे-दिवा लोकल मार्गाच्या सहाव्या मार्गाचे पार पडले. मात्र हा लोकार्पण सोहळा दावने आणि वैष्णव यांनी वडापावर मारलेल्या ताव यामुळेच अधिक चर्चेत आला. हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दानवे यांना टोला लगावला.
मतदारसंघात कार्यकर्त्यांनासोबत फिरत असताना आमदार रोहित पवार यांनी एका हॉटेलात मिसळवर ताव मारला. पण या मिसळची तुलना पुरणपोळ्यांशी करत रोहित यांनी थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला.
अमृता फडणवीस यांच्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि पुरणपोळ्या हा विषय चर्चेत आला होता. झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात अमृता यांनी ते 30 ते 35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचं असं म्हटलं होतं.
दुसरीकडे रावसाहबे दानवे आणि अश्विनी वैष्णव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रेल्वे स्थानकात वडापाववर ताव मारला होता. मात्र वडापाव खाल्ल्यानंतर त्याचे बील न देतातच ते निघुन गेल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर भाजपवर टीका करण्यात आली होती.
मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं..
आणि हो…
मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं. pic.twitter.com/90TgP8c9PF— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 21, 2022
रोहित पवार यांनी हाच धागा पकडून म्हटलं की, मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं.. आणि हो… मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं.