नवी दिल्ली – बिलकिस बानो प्रकरणात ११ दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. बिलकिस बानोच्या वकिलांनी ही याचिका दाखल करताना म्हटले होते की अजूनही बिलकिस बानो त्या प्रसंगाच्या धक्क्यातून सावरलेली नाही.
अशात दोषी आरोपींची सुटका करण्यात आली. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात प्रश्न उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नेमक्या कुठल्या निकषांवर ही सुटका केली ते विचारले होते.
या प्रकरणात मे २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसीनंतर गुजरात सरकारने ११ दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
दरम्यान, २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातच्या गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळण्यात आले होते. या ट्रेनमध्ये कारसेवक अयोध्येहून परतत होते. या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या घटनेतून वाचवण्यासाठी बिलकिस बानोने तिच्या मुलीसह आणि कुटुंबासह आले गाव सोडले होते.