नवी दिल्ली – राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या बिहार राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने येथील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय.
लो कर लो बात।
15 साल से मटर छिल रहे थे क्या?? 15 साल बाद नीतीश जी और सुशील जी को महसूस हुआ कि बिहार में बेरोज़गारी है।
तेजस्वी तुम लोग को अब मुद्दे आधारित राजनीति सिखाएगा। https://t.co/XyCWBCQWwb
— Rabri Devi (@RabriDeviRJD) October 14, 2020
अशातच एनडीए आणि महाआघाडीचे नेते सतत एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सतत टीका करणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यावेळी स्वत: ट्विटर करून फसले आहेत.
काराकाटच्या एका निवडणूक प्रचार सभेत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हणाले कि,’ जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही’ त्यांच्या या वक्तव्यावर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. त्यांपैकी एक बातमी सुशील मोदी यांनी ट्विटरवर शेअर केली. मोदी यांचे ट्विट रिट्विट करत राबडी देवी यांनी निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या राबडी देवी
“लो कर लो बात. 15 वर्षांपासून काय मटार सोलत होतात काय?, बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना 15 वर्षांनंतर समजलं आहे. तेजस्वी तुम्हा लोकांना आता मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल” असं ट्विट राबडी देवी यांनी केलं आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. सर्वच पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर मिळेल त्या शब्दात आरोप-प्रत्यारोप करत आहेत.