मुंबई – अभिनेता सलमान खानला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून न्यायालयाने सलमान खानविरुद्ध २०१९ साली केलेली तक्रार फेटाळून लावली आहे. या निकालामुळे बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
2019 मध्ये अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने सलमान खानवर काही आरोप केले होते. सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप पत्रकाराने केला होता. पत्रकाराने सर्वप्रथम याबाबत अंधेरीतील दंडाधिकार्यांकडे तक्रार केली.
#Breaking Bombay High Court has quashed a complaint against Bollywood actor Salman Khan alleging criminal intimidation filed by a journalist in 2019. @BeingSalmanKhan #BombayHighCourt pic.twitter.com/HNJ2vm4pEj
— Bar & Bench (@barandbench) March 30, 2023
पत्रकाराच्या वकिलाने तक्रार दाखल करताना सांगितले होते की, अशोक पांडे 2019 मध्ये सलमानसोबत फोटो काढत असताना अभिनेत्याच्या अंगरक्षकांनी त्याचा फोन हिसकावून मारहाण केली. सलमानने आपल्याला धमक्याही दिल्याचा आरोपही त्याने केला आहे. मात्र, आज हायकोर्टाने सर्व आरोप निराधार ठरवत सलमानला या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे.