मुंबई : गुजरातमध्ये एटीएसने ६०० कोटींचे ड्रग्स जप्त केल्यानंतर इकडे राज्यातही मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.
या कारवाईत दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचे विशाखापट्टणम कनेक्शन समोर आले आहे.
गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ३,००० किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळले होते. एनसीबीने केलेल्या तपासात जळगावमधील हा गांजा आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममधून आणण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.