नवी दिल्ली – बैलगाडा शर्यतीबाबत अखेर अंतिम निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीवर कोणतीही बंदी नसणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले होते.
याआधी डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यानंतर या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आली आहे. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारच्या कायद्याची वैधता कायम ठेवत राज्यातील पारंपारिक जल्लीकट्टूला परवानगी असल्याचे खंडपीठाने नोंदवले.
मात्र, अखेर न्यायालयाने यावर निकाल दिला असून राष्ट्रवादीच्या खासदर सुप्रिया सुळे यांनी देखील आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संदर्भातील एक ट्विट शेअर करत त्यांनी म्हंटलं.. “भिर्रर्रर्र…. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर कायमची उठवली. यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भिर्रर्रर्र….
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर कायमची उठवली. यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यत हा क्रीडाप्रकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे.याखेरीज खिल्लार या देशी गोवंशाची यामुळे जपणूक होणार आहे. या निर्णयामुळे… pic.twitter.com/W60xwqBLdo— Supriya Sule (@supriya_sule) May 18, 2023
बैलगाडा शर्यत हा क्रीडाप्रकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. याखेरीज खिल्लार या देशी गोवंशाची यामुळे जपणूक होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक होणार आहे. या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार..’ असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.