मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी करत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केले.
तसेच, पुन्हा भाजपसोबत युती करत सरकार स्थापन करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत भाजपला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन केली.
आणखी एक भूकंप? “भाजप आमची शत्रू नाही; भविष्यात काय होईल…” – दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे चर्चा
शिवसेना आमदारांसोबतच खासदारही महाविकास आघाडी प्रयोगावर नाराज असल्याचे दिसून आले होते. यावेळी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहीत अप्रत्यक्षपणे भाजपसोबत हातमिळवणी करण्याचे भाष्य केले होते.
त्यानंतर शिवसेनेने खासदार गवळी यांना धक्का देत लोकसभेत शिवसेना प्रतोदपदावरून हटविले आहे. त्यांच्या जागी आता राजन विचारे यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या लेटर हेडवरून हे आदेश देण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? विचारताच एकनाथ शिंदे यांनी तडक सांगितलं…