मुंबई – राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अनपेक्षित धक्का देत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला. यातून सावरत नाही तोच या निवडणुकीच्या त्या रात्रीच शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांच्या मदतीने बंड पुकारत आणखी एक धक्का दिला. या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
यामुळे आघाडी सरकार कोसळले आणि आता शिंदे गट आणि भाजप यांचे युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान महाविकास आघाडी आणि शिंदे गट यांच्या शाब्दीक चकमक पाहण्यास मिळाली. दरम्यान एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये न जाता अजूनही आम्ही शिवसेनेतच असून उद्धव ठाकरेच आमचे पक्षप्रमुख असल्याचं ठामपणे सांगत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेमकं पुढे काय होणार आहे? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे ट्वीटमध्ये?
दीपाली सय्यद यांनी केलेल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे आपल्याला कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असं नमूद केलं आहे. “शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्यातली शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. एकनाथ शिंदेंनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका”, असं या ट्वीटमध्ये दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढे काय होईल, हे आपल्याला माहीत नसल्याचं दीपाली सय्यद यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “भाजपा आमची शत्रू नाही. त्यांच्याविरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. पण वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण भाजपाने याची दखल घेणं गरजेचं आहे”, असा सूचक वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केलं आहे.
@BJP4Maharashtra
@ShivSena
@CMOMaharashtra pic.twitter.com/P4kCccD9gr— Deepali Sayed (@deepalisayed) July 6, 2022
अमृता फडणवीस म्हणाल्या,’मी ठाकरे कुटुंबाला एवढंच सांगेन की, सक्षम लोक…’